संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
आप्पांचा जन्म चावरे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावी श्री गणेश चतुर्थीला सन 1958 साली झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कामेरी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल इस्लामपूर व जालना येथे झाले. व महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेज इस्लामपूर येथे झाले.
कामेरी गावचे सुपुत्र कृषीभूषण स्व. जगदीश शामराव पाटील (आप्पा) हे एक भारदस्त व्यक्तीमत्व पिळदार मिशा, बलदंड, शरीरयष्टी, रुबाबदार चेहरा, अवती भवती सदैव गर्दी आप्पांच्या खिशात नेहमी असणारे रिव्हाॅल्वर व ब्रँडेड परफ्युम या बद्दल सर्वांनाच नेहमी आकर्षण असायचे केवळ परफ्युमच्या वासावरून 'आप्पा' जवळच असल्याची खात्री व्हायची प्रत्येक मतदानावेळी गावाच्या मुख्य चौकामध्ये दिवसभर असणारा आप्पांचा वावर कार्यकर्ता यांचा उत्साह वाढविणारा असायचा.
तर तल्लख विनोदबुद्धी हजरबाबीपणा हे त्यांच्या स्वभावाचे वेगळे वैशिष्ट्य होते एक दिलदार, धाडसी, कार्यतत्पर, संयमी आणि विचारी व्यक्तीमत्व म्हणून आप्पांची ओळख होती. समाजकारण व राजकारण यांचा समतोल राखताना नेहमीच समाजहिताचे पारडे जड राखले वैयक्तिक पातळीवर टीका टाळताना केवळ गावाच्या हिताचाच विचार केला. निवासार्थीपणा व दातृत्व हे जन्मजात मिळालेले गुण त्यांनी जन्म भर जपले यामुळेच अंत्ययात्रेवेळी सर्वसामान्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. कपड्यांना इस्री करणा-या ..... पासून ते रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाला "आप्पा" आपले वाटायचे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे व बापूचे सहकारी स्व. शामराव रामचंद्र पाटील (मामा) यांनी बापूंच्या काळात निष्ठावान कार्यकत्याचे बीज पेरले आप्पांनी खत पाणी घालून त्यांचे वटवृक्षात रुपांतर केले. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सुजलाम सुफलाम वाळवा तालुक्याचे पाहिलेले स्वप्न मा. ना. जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सत्यात उतराचे याचाच एक भाग म्हणजे कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे अनेक वर्षे चेअरमन होते.
कै. जगदीश पाटील (आप्पा) यांनी कामेरी येडेनिपाणी सह. पाणीपुरवठा योजना कर्जमुक्त करुन संस्थेच्या ठेवी ठेवून सक्षम करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. तसेच राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी स्थापन करून आर्थिक अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले. नामदार जयंतराव पाटील (साहेब) यांचे मार्गदर्शनातून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक म्हणून 25 वर्षे कार्यरत होते.
त्यांनी आतापर्यंत राजारामबापू पाटील सूतगिरण , शेतकरी विणकरी सूतगिरण, राजारामबापू पाटील विकास सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. तर कामेरी येडेनिपाणी सह. पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या तांत्रिक सल्लागार समिती मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाच्या वेळी ते साखर कारखाना संचालक म्हणून पदावरती होते.
आधुनिक शेती वरती त्यांचे विशेष काम होते त्यांनी ऊस उत्पादनाचे रेकॉर्ड मोडीत काढली होती. ह्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना 'कृषिभूषण' पुरस्कार देवून सन्मानित केले होते. तर खानदेश कृषी गौरव पुरस्कार - 2010 व दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार - 2011 या महात्वाच्या पुरस्कारांनी आप्पा सन्मानीत होते. तर विविध शासकीय निमशासकीय संस्थेनी त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले होते. त्याचीच पोहोच पावती म्हणून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांचेशी त्यांना मुंबई येथे भेटण्याची संधी मिळाली होती. ऊस पिकावरील भारतातील पहिला फुल ऑटो मायजेशन ठिबक सिंचन प्रयोग तो त्यांनी यशस्वी करून दाखविला. ठिबक सिंचन चा प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, येथील शेतकरी व विविध संस्थेने भेट दिली होती. तर घाना, इस्रायल, इथियोपिया, जर्मनी येथील शासकीय प्रतिनिधी यांनी भेट दिली.
आप्पा चा स्वभाव सर्व समावेश असा आहे. त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेतात. त्यांच्या जवळ गरीब श्रीमंत तसेच जाती पातीचा भेदभाव अजिबात दिसणार नाही त्यामुळे युवकापासुन ते वयस्कर लोकांचा नेहमीच राबता असायचा. त्यांच्या कडे येणा-या प्रत्येकांची आपूलकीने ते नेहमी चौकशी करणार तसेच स्वता:च्या गाडीने ते कोल्हापूर, बेळगाव, पासून मुंबई पर्यंत लोकांना त्यांच्या आजारपणात लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत होते. लोकांना डाॅक्टर पर्यंत नेऊन स्वःता दिवस खर्च करुन त्यांना मदत करण्यात त्यांचा नेहमीचा हातभार होता.गावातील विविध धार्मिक संस्थाना, व बाळगिरी मठ, खंडोबा मंदीर, रघुनाथ मंदिराचे जिर्णोद्धार साठी आप्पांनी आर्थिक मदत केली होती. राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना व कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेमार्फत कामेरी व येडेनिपाणी गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. कार्यकर्ते च्या अडचणीच्या वेळी आप्पा खंबीरपणे पाठीशी उभा राहणेच्या स्वभावामुळे लोकांना एक नेहमीचा आधार वाटायचा त्यांच्या विषयी सांगण्या सारखे बरेच आहे परंतु एकाच शब्दात सांगायचे तर "आप्पा म्हणजे बाप माणूस"
त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले बरोबर जेवण खाणे तसेच त्यांचा पाहुणचार करणे बाबत त्यांना विशेष आनंद मिळत होता. त्यामुळे आमच्या सारखे अनेक जण त्यांच्या घरी नेहमीच हक्काने घरच्या सारखे वावरत होते. त्यांच्या पत्नी म्हणजे वहिनी साहेब व घरातील सर्वांची त्यांना साथ होती. कधीही न कंटाळता घरी आलेल्या व्यक्ती ना चहापाणी व जेवण खाणे नेहमीच करत होते.
त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू पृथ्वीराज पाटील तसेच त्यांचे सुपुत्र सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, विक्रम पाटील व संग्राम पाटील व पुतणे राणासिंह पाटील, पुतणी डॉ. ऋतुजा गायकवाड - पाटील हे समाजासाठी सदैव तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध आहेत.
Ø घटनाक्रम -
Ø भुषविले पदे -
भविष्याची वाटचाल पाटील कुटुंबिय आप्पांच्या विचारांवर करतील व आप्पांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल…. 0
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.